नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सध्या सुरक्षेच्या कारणांवरून लखनऊ पोलिसांवर त्यांनी केलेला आरोप व उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून अराजकता पसरवण्यात आल्याचाही केलेल्या आरोपामुळे अधिक चर्चेत आहेत.
ॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै।।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 30, 2019
अशातच प्रियंका गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे ॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै।। हा दुर्गा सप्तशतीचा मंत्र ट्विट केला आहे. सध्या त्यांच्या या ट्विटवर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहे.
Priyanka Gandhi should change her name to ‘Feroze Priyanka’: Sadhvi Niranjan Jyoti
Read @ANI Story | https://t.co/RS9J5QFGr0 pic.twitter.com/RuhNYTuAwt
— ANI Digital (@ani_digital) December 31, 2019
याच पार्श्वभूमीवर साध्वी निरंजन ज्योति यांनी प्रियांका गांधींवर खोचक टीका केली आहे. साध्वी निरंजन ज्योतिने म्हटले की,’प्रियंका गांधीने आपले ‘गांधी’ आडनाव बदलून फिरोझ प्रियंका असं नाव ठेवायला हवं. असेही त्या म्हणाल्या.