श्रीनगर : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर विषयीचे कलम 370 रद्द केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या खडाजंगी होत असताना दिसत आहे. राज्यपाल मलिक यांनी आता चक्क राहुल गांधी यांच्या कलम 370 च्या भूमिकेवर हल्ला केला आहे. परंतू, हा हल्लाबोल करत असताना मलिक यांची जीभ चांगलीच घसरली. यावेळी मलिक यांनीश जर राहुल गांधी 370 कलम चे समर्थक असतील तर लोक त्यांना बूटांनी मारतील, असे त्यांनी म्हटले.
J&K Guv says,”Rahul Gandhi ne political juvenile ki tarah behave kiya hai.Aaj UN mein Pak ki chithi mein uske bayanat darz hai… jis waqt desh mein chunav aayega unke virodhi ko kuch kehni ki zaroot nahi hai woh bas ye keh denge,yeh 370 ke himayati hai toh log juton se maarenge” pic.twitter.com/gqXQARPMNf
— ANI (@ANI) August 28, 2019
काश्मीर प्रश्नावरून राहुल गांधी आणि सत्यपाल मलिक यांच्यातील वाक्युद्ध वाढतच जात आहे. दरम्यान, राहुल गांधी हे देशातील प्रतिष्ठित कुटूंबातून आहेत, परंतू, ते राजकारणात सध्या नवशिक्याप्रमाणे वागत आहेत, पाकने संयुक्त राष्ट्राला लिहीलेल्या पत्रात राहुल गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे, गांधींनी हे करायला नको होते, तर ज्यावेळी राज्यात निवडणुका होतील त्यावेळी यांच्याविषयी काही बोलायला नको, फक्त राहुल गांधी 370 कलमचे समर्थक आहेत तर लोक त्यांना बुटांनी मारतील, असे वक्तव्य मलिक यांनी केले आहे. दरम्यान, कलम 370 च्या नंतर सत्यपाल मलिक यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मलिक यांची राहुल गांधींना बोलताना जीभ घसरली.