नवी दिल्ली : आपल्याला मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची अजिबात इच्छा नव्हती असे खळबळजनक वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून खुलासा करण्यात आला आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी देखील या वृत्तास दुजोरा देत इच्छा नसतानाही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं? या मागचे कारण देखील सुशील कुमार मोदी यांनी सांगितले आहे.
“त्यांना(नितीश कुमार) मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. भाजपा आणि जदयूच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्या नावावर व दूरदृष्टीवर निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांच्यासाठी मतदान केलं आहे. अखेर जदयू, भाजपा व विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला.” असं सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं आहे.
He didn’t want to be the CM. BJP & JDU leaders told him that we fought the poll on his name & vision & said that people had voted for him. In the end, he accepted to become the CM on request of JDU, BJP & VIP leaders: BJP leader Sushil Kumar Modi https://t.co/IHUy9rMHJU pic.twitter.com/G8a3m7HOX3
— ANI (@ANI) December 28, 2020
तर, “यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे. कोणालाही मुख्यमंत्री बनवा. कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाही” अशा शब्दांमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यावरील निर्णयाबद्दल बोलताना म्हटलं आहे.
I had no desire to become the Chief Minister. I had said that the public had given its mandate and anyone can be made the Chief Minister, BJP could make its own Chief Minister: Bihar CM Nitish Kumar (27.12.2020)
(file photo) pic.twitter.com/yiQsCTXaEw
— ANI (@ANI) December 28, 2020
या अगोदरही बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान नितीश कुमार यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचेही नमूद केले होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्यावरुन बरीच चर्चा रंगली होती. यंदाच्या त्यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसने थेट त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश यांच्या या वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.