वॉशिंग्टन – प्रतिस्पर्धी म्हणून चीनला भारताबद्दलचा वाटत असलेला धोका आता अधिक प्रमाणात वाढू लागला आहे. त्यातूनच भारत आणि अमेरिका आणि अन्य लोकशाही देशांदरम्यानची वाढती मैत्री चीनला खुपायला लागली आहे.
त्यातूनच जगातील सर्वात महत्वाचा सत्ताकेंद्र बनू देण्यास चीनकडून अडथळे आणले जाऊ लागले आहेत, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या एका अहवालामध्ये म्हटले आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन ज्यो बायडेन यांच विजय झाल्यानंतर विदेश मंत्रालयाच्या या अहवालातील बाबी उघड करण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा, स्वायत्तता आणि आर्थिक हितसंबंधांबाबत अन्य प्रादेशिक देशांमध्ये कमी लेखण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो आहे.
चीनच्या महत्वाकांक्षी विस्तारवादी धोरणाला भारताकडून ठाम विरोध होत आहे. त्यातच अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अन्य लोकशाहीवादी देशांबरोबर भारताचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाऊ लागला असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.