नवी दिल्ली : कोरोनापासून बचावासाठी देशात लॉकडाऊन लागू केला आहे मात्र तरी देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत 9,352 लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 979 रुग्ण बरेदेखील झालेत. 324 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येतो. महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूदर देखील सार्वाधिक आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र 149, मध्य प्रदेश 43, गुजरात 26, पंजाब 11, दिल्ली 24, तमिळनाडु 11, तेलंगणा 16, आंध्र प्रदेश 7, कर्नाटक 6, पश्चिम बंगाल 7, जम्मू-काश्मीर 4, उत्तर प्रदेश 5, हरियाणा 3, राजस्थान 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश और ओडिसा मध्ये प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन करण्यात आलं. या काळात जिल्हा पातळीवर केलेल्या उपाययोजनांचा परिणां दिसायला सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना प्रभावित अशा 15 राज्यांतील 24 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हचा एकही रुग्ण समोर आला नाही. यात महाराष्ट्रातील, छत्तीसगड माधील दुर्ग आणि बिलासपुर, केरळातील वायनाड, मणिपुरील इंफाळ पश्चिम आणि बिहारमधील पाटना या राज्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊनच्या काळात देशातील प्रत्येक राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करण्यासाठी सरकरारने मालवाहतूक सुरु ठेवली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंसंबधीत सर्व औद्योगिक उद्योग सुरु ठेवण्यात आलं आहे.