नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 78 हजार पार पोहोचली आहे.
आतापर्यंत 78 हजार 03 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 2549 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 26235 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मागील 24 तांसांमध्ये 3722 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 134 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून कोरोनाबाधितांची संख्या 26 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात असून एकूण कोरोना बाधित 9267 रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून 9227, राजधानी दिल्लीमध्ये 7998, राजस्थानमध्ये 4328, मध्यप्रदेशमध्ये 4173, उत्तरप्रदेशमध्ये 3729, आंध्रप्रदेशमध्ये 2137, तेलंगणामध्ये 1367 आणि बिहारमध्ये 940 कोरोना बाधित आहेत.