मुंबई: किती टक्के लोकांना नाईटलाईफचा उपयोग होणार? हिम्मत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा. असे आवाहन भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना केले आहे. तसेच ती महाराष्ट्राची खरी गरज असल्याचे राणे म्हणाले. मुबंईत नाईटलाईफ सुरु करणे हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. येत्या २६ जानेवारीला नाईटलाईफचा प्रयोग मुंबईत करण्यात येईल.
दरम्यान, मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.