पाटणा – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. देशव्यापी लॉक डाऊनमुळे नौकरी निमित्ताने परराज्यात स्थलांतरित झालेले कर्मचारी, मजूर, विद्यार्थी, अडकून पडले आहेत. देशातील काही राज्य आता परराज्यात अडकून पडलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी हालचाली करताना दिसतायेत. उत्तर प्रदेशने सर्वप्रथम राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची राज्य वापसी केली होती. यानंतर आता इतर राज्यांमधून देखील अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, कोटा येथे अडकलेल्या बिहारमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी परत आणावं अशी मागणी बिहारच्या एका आमदारांनी केली आहे. मात्र ही मागणी करताना त्यांनी मांडलेल्या राजकीय गणितामुळे आमदार महोदयांना नेमकं विद्यार्थ्यांची आस्था असल्याने त्यांना परत आणायचंय की स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.
बिहारचे विधानपरिषद आमदार संजय पासवान यांनी अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत बोलताना, ‘बिहारमधील केवळ १ हजार विद्यार्थी कोटा येथे अडकले असले तरी त्यांच्याबाबत सहानभूती असणारी १ लाख कुटुंब आहेत. समजा या कुटुंबांमध्ये प्रत्येकी ५ मतदार असले तर आपला ५ लाख मतांचा तोटा होतोय. यामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विद्यार्थ्यांना ३ मे पूर्वी बिहारमध्ये परत आणावं. अन्यथा आगामी निवडणुकीत आपलं मोठं नुकसान होईल.’ असं मत व्यक्त केलं. आता आमदार पासवान यांच्या या वक्तव्यावर बिहारमधील विरोधी पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.
No. of children may only be 1000 but 1 Lakh families are affected due to it, they have sympathy for these children. If 1 Lakh families have 5 voters each, 5 Lakh votes will be affected. So I request the CM to bring back our children from Kota & Pune: Sanjay Paswan, BJP MLC #Bihar https://t.co/UXSlQF0UhT
— ANI (@ANI) April 29, 2020