मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकांचे लागून आता 15 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी झाला आहे परंतू, राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापण होण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे राज्यात फोडाफोडीचे राजकारण होणार असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री शिवसेना युवाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रिट्रीट हॉटेलला अचानक भेट देत आमदांरांसोबत चर्चा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमदारांसोबतच हॉटेलमध्ये मुक्काम केला.
तत्पूर्वी, राज्याच फोडाफोडीचे राजकारण होणार होऊ नये म्हणून शिवसेनेने खबरदारीचा उपया म्हणून आपल्या सर्वच आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता सेनेच्या सर्वच नवनिर्वाचित आमदारांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे.