अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांना बॉलीवूडमध्ये पॉवर कपल म्हणून संबोधले जाते. मात्र, अजूनही अभिषेक ऐश्वर्याला घाबरतो आहे. अभिषेकची बहीण श्वेता नंदाने एका इंटरव्ह्यूमध्ये ही बाब सांगितली.
करण जोहरच्या गप्पांच्या कार्यक्रमात तिने ही गोष्ट सांगितली. अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 मध्ये झाले होते. त्यांची लव्ह स्टोरी 2000 सालापासून सुरू झाली होती.
“ढाई अक्षर’ मध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर “उमराव जान’मध्येही त्यांनी एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या शुटिंगच्यावेळी त्यांच्यातील प्रेम वाढत गेले होते.
“गुरू’च्या शूटिंगच्यावेळी टोरांटोमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला लग्नाबद्दल विचारले होते. ऑनस्क्रीन बघिलेली ही जोडी ऑफस्क्रीन जोडी झाल्यावर त्यांच्या फॅन्सनी अगदी डोक्यावर घेतली होती. हे दोघेही नेहमीच एकत्र दिसत असतात.
अभिषेक त्याची आई जया बच्चनना घाबरत असेल असा अनेकांचा अंदाज होता. त्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, म्हणून असे वाटणे स्वाभाविक आहे.
मात्र, प्रत्यक्षात अभिषेक ऐश्वर्याला घाबरतो, हे ऐकून धक्काच बसतो. ऐश्वर्याला आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवण्यासाठी त्याला धाकात ठेवणे आवश्यक वाटत असावे कदाचित.