नवी दिल्ली – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातही त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाही. तो चालू हंगामात 3 वेळा गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर बाद) झाला आहे. यानंतर पहिल्यांदाच विराटने गोल्डन डकविषयी खुलासा केला आहे. तसेच गोल्डन डक झाल्यानंतरही तो का हसला होता, याचे उत्तरही त्याने दिले आहे.
एका मुलाखतीत विराट म्हणाला, गोल्डन डकनंतर मला खूप असहाय वाटत होते. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत माझ्यासोबत असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. कदाचित हेच कारण होते की, माझ्या चेहऱ्यावर हास्य खुलले होते.
मला असे वाटते की, माझ्या दीर्घ क्रिकेट कारकिर्दीत आता सर्वकाही पाहिले आहे. हा खेळ मला जे काही दाखवू शकतो, ते सर्वकाही मी पाहिले आहे. तसेच खराब फॉर्मबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “लोक माझ्या चपलांमध्ये पाय घालू शकत नाही. किंवा मला जे जाणवते, ते त्यांना जाणवत नाही.
तसेच बाहेरच्या जगापासून स्वत:ला वेगळे ठेवण्यासाठी एक तर मी टीव्हीचा आवाज बंद करतो किंवा लोक माझ्याबद्दल जे काही बोलतात, त्यावर मी लक्ष देत नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांकडे दुर्लक्ष केले.