मेलबर्न : भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना हिने म्हटले आहे की, आमच्या संघावर टी-२० विश्वचषक स्पर्धेत कमीत कमी दबाव असेल. आम्ही हसत-खेळत या स्पर्धेचा आनंद लुटू. या स्पर्धेत भारत-आॅस्ट्रेलियाच विजयाचे दावेदार असतील. मात्र, ‘अंडरडाॅग्ज थायलंडकडून सावध राहावे लागेल’.
हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदात भारतीय संघाने गेल्या काही महिन्यात चमकदार कामगिरी केली आहे. सर्वच खेळाडू तंदुरूस्त असून प्रत्येकाला फाॅर्मही गवसलेला आहे, त्यामुळे विश्वचषक स्पर्धेचा ताण न घेता, आम्ही खुलेपणाने खेळू असे सांगून स्मृती पुढे म्हणाली की, प्रतिष्ठेचा विश्वचषक जिंकणे, हेच आमचे सध्याचे ध्येय आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही म्हटले आहे की, भारतीय संघ कोणत्याही बलाढ्य संघासमोर आव्हान उभे करू शकतो.
दरम्यान, आगामी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि आॅस्ट्रेलिया या दोन संघातच मोठी चुरस असेल आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा संघच विश्वचषक उंचावेल, असे प्रतिपादन आॅस्ट्रेलियाचा निवृत्त वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने केले आहे.
24 hours to go for the women's #T20WorldCup opening game between Australia and India.
Can't wait! 💃🕺 pic.twitter.com/cQSzgawKIW
— T20 World Cup (@T20WorldCup) February 20, 2020
वर्ष २०२० च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. सलामीचा सामना भारत आणि आॅस्ट्रेलियादरम्यान सिडनी येथे खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि आॅस्ट्रेलिया हे दोन्ही संघ एकाच गटात खेळत असल्याने साखळी स्पर्धेत धावगतीसह गुणांकडे दोघांनाही बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे.