नवी दिल्ली – प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत देशातील 1 कोटी 32 लाख उमेदवारांना आत्तापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती सरकारतर्फे आज संसदेत देण्यात आली.
ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू मुलांना हे प्रशिक्षण दिले जाते. या मुलांच्या राहण्याजेवणाचा तसेच त्यांच्या परिवहन सेवेचा खर्च सरकार करते. या योजने अंतर्गत एसटीटी आणि आरपीएल स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते पण त्याचा नोकरी देण्याचा संबंध जोडण्यात आलेला नाही.
या प्रशिक्षणाचा उद्देश ग्रामीण भागातील उमेदवारांना रोजगार सक्षम करणे हा आहे असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. ज्या 1 कोटी 32 लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे त्यातील 65 लाख लोकांना शॉट टर्म स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि 65 लाख लोकांना विस्तृत स्वरूपाचे प्रशिक्षण दिले गेले आहे.