मनमाड : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत रेल्वे बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे विभागाने बारा गाड्यांना परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाड इथून पहिली ट्रेन प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली.
नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना घेऊन मुंबईपर्यंत धावणारी पंचवटी एक्सप्रेस सुरु करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ती मागणी पूर्ण केल्यानंतर आज सकाळी सहा वाजता पंचवटी एक्सप्रेस विशेष ट्रेन निघाली. मात्र या गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षण केल्यानंतरच प्रवास करण्याची परवानगी असल्याने, किमान चाकरमान्यांना पासची सवलत मिळावी अशी मागणी करण्यात आली.
आज पहिलाच दिवस असल्याने फारसे आरक्षण झाले नसल्याने गाडी तशी रिकामीच गेली. आज मुंबईपर्यंत केवळ सेकंड क्लासचे 320 तर आठ प्रवाशांनी मुंबईपर्यंत आरक्षण केले होते. आज गाडीला फारसे प्रवासी नसले तरी सोमवारपासून त्यात वाढ होईल अस रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.