नवी दिल्ली – भारत-चीन तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी लडाख दौरा केला. नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण असून खूपच नाजूक आणि गंभीर स्थिती आहे. तर जवानांचे मनोधैर्य उंचावले आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार आहेत, असे लष्कर प्रमुखांनी सांगितले आहे.
लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणाले कि, नियंत्रण रेषेवर २-३ महिन्यापासून तणावपूर्ण परिस्थती आहे. परिस्थिती लक्षात घेता आपल्याला संरक्षणासाठी आम्ही खबरदारीची पावले उचलली आहेत. जेणेकरून आपली सुरक्षा आणि अखंडता कायम राहील. आम्ही चीनसोबत चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच भविष्यातही चर्चा सुरूच राहील.
#WATCH: Army Chief says to ANI, “They (the jawans) are highly motivated. Their morale is high and they are fully prepared to deal with any situation that may arise. Our officers and men are the finest in the world and will make not only the Army but also the nation proud.” pic.twitter.com/EFMZ3j77VO
— ANI (@ANI) September 4, 2020
आपले जवान सक्षम असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो आपले अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम आहेत. ते केवळ सैन्यालाच नव्हेतर देशालाही गौरवान्वित करतील, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले आहे.