मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून. एकनाथ शिंदे लवकरच भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा सुरु असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘समोर या , चर्चा करू बसून मार्ग काढू’ असे म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनात म्हंटले आहे की, ‘आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवी माहिती समोर येते. आपण आज देखील मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी बरेच संपर्कात आहेत. आपण आजही शिवसेनेत आहात. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझे आपल्या सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्यासमोर बसा . शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
समोर येऊन बोला आपण मार्ग काढू
शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकता नाही समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं भावनिक आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे.
50 आमदार हे आपल्या मर्जीने आले
तर दुसरीकडे आज आसाम मधील रॅडिसन ब्लु हॉटेलच्या बाहेर येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लवकरच मुंबईत येऊ असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय 50 आमदार हे आपल्या मर्जीने आले. त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही, आजही आम्ही शिवसेनेचेच आहोत असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.