मुंबई – कंगनाच्या मुंबईबाबतीतील बेताल वक्तव्यानंतर तिच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. अशातच मुंबई महापालीकेच्या कारवाईनंतर कंगना आणखीनच संतप्त झाली असून आता तिने थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. याबाबत जारी केलेल्या व्हिडिओमध्ये कंगना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन त्यांना अरेतुरेची भाषा करताना दिसत आहे. आता तिने पोस्ट केलेला हाच व्हिडीओ तिच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
कंगनाने मुख्यमंत्र्यांना अरेतुरे केल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कंगनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याची तक्रार विक्रोळी पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. पुराव्याखातर या तक्रारीसोबत कंगनाच्या व्हिडीओचे ट्विट देखील जोडण्यात आले आहे.
काय म्हणाली कंगना?
कंगना राणावत हिंदी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यात तिने मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अरेतुरेच्या स्वरूपात केल्याने त्यावरही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या संदेशाची सुरुवात तिने उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है ? अशा विधानाने केली आहे. तू फिल्म माफियांना हाताशी धरून माझे घर पाडून, माझा बंगला पाडून माझा बदला घेऊ शकशील? आज मेरा घर तुटा है, कल तेरा घमंड तुटेगा असे तिने यात नमूद केले आहे. हे कालचक्र असते ते नेहमीच सारखे नसते, बदलते असते असे तिने म्हटले आहे.
आजच्या या घटनेवरून काश्मिरी पंडितांवर काय प्रसंग ओढावला असेल याचा अनुभव मला आला. मी आता केवळ अयोध्येवरच नव्हे तर काश्मिरी पंडितांवर एक स्वतंत्र चित्रपट काढणार आहे, असे तिने यात म्हटले आहे. माझ्या बाबतीत हे असे होणार याची मला कल्पना होतीच, उद्धव ठाकरे ही क्रुरता, ही दहशत माझ्याबाबतीत घडली हे चांगले झाले. कारण यालाही काही वेगळा अर्थ आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र असे नमूद करीत तिने या व्हिडिओचा समारोप केला आहे.
तुमने जो किया अच्छा किया 🙂#DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020