नगर – जिल्ह्यातील आठ मोठ्या,मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा असल्याने यंदा उन्हाळ्यातही बऱ्याच गावांची तहान भागेल असा अंदाज जलसंपदा विभागाकडून व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षातील अवर्षणातून काही लघुप्रकल्प अगडीच कोरडे ठाक पडले होते. मात्र यंदा त्याउलट परस्थिती असून मोठे ,मध्यम आणि लघु प्रकल्पातून समाधानकारक पाणी साठा आहे.
सध्या मुळा ,भंडारदरा, निळवंडे या मोठ्या प्रकल्पातून सुमारे 90 टक्के पाणी साठा असून त्याच बरोबर मध्यम व लघु प्रकल्पातून ही बऱ्यापैकी पाणी साठा असल्याने नोव्हेंबर -डिसेंबर दरम्यान देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तनाची मागणीच झाली नाही. केवळ एका ग्रामपंचायतीकडून पाणी आवर्तन सोडण्यासाअठी अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र कालवा समितीच अस्तित्वात नसल्याने तेही पाणी देण्यात आले नाही.
डिसेंबर 2018 च्या तुलनेत यंदा धरणात मुबलक साठा असल्याचे निदर्शनास आले आहे.गेल्यावर्षी निळवंडे शरणात 56 टक्के पाणी साठा होता तर भंडारदरा धरणात 43 टक्के तर मुळा धरणात 46 टक्के इतका पाणी साठा होता.त्यामामुळे मेमहिनात यासर्व धरणांनी तळ गाठला होता.
मात्र यंदा तशी परस्थिती नाही यंदा डिसेंबरच्या मध्यापर्यंत सर्व प्रकल्पातील पाणी साठा मुबलक असल्याने तसेच अनेक कोल्हापूर टाईप बंधारे तुडुंब भरल्याने पान्याच्या आवर्तानाच्या मागणी साठी अद्याप अर्जच आलेले नाहीत. तसेच डिसेंबरमध्ये दावे लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तनही वाचल्याने यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकून राहिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.