जीएसटी रिटर्न सादर करण्याची पद्धत किचकट असल्याची सार्वत्रिक तक्रार असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या एप्रिल महिन्यापासून सोपी जीएसटी रिटर्न पद्धत लागू केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. त्या म्हणाल्या की जीएसटीमुळे ग्राहकांना संपुर्ण वर्षात सुमारे एक लाख कोटी रूपयांचा लाभ झाला आहे.
या पद्धतीमुळे देशातील इन्स्पेक्टर राजही संपले आहे. तसेच परिवहन क्षेत्रालाही या नवीन करपद्धतीचा मोठा लाभ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की जीएसटी कर पद्धती लागू झाल्यामुळे देशातील प्रत्येक घरातील सरासरी चार टक्के खर्च वाचला आहे.
मात्र हा तर्क त्यांनी कशाच्या आधारे मांडण्यात येत आहे याचा फारसा तपशील दिला नाही. जीएसटीमुळे वस्तु स्वस्त झाल्यामुळे त्याचा लाभ देशभरातील ग्राहकांना होत आहे त्या आधारावर त्यांनी त्यांचा चार टक्के घर खर्च कमी झाल्याचा दावा केला आहे..