सासवड -आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करून सर्व गट व गणात पक्षबांधणीचे काम करावे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वबळाचे संकेत देत सर्व कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीत युती किंवा आघाडी कशीही झाली. तरी निवडणुका या लढायच्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
भिवडी (ता पुरंदर) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शाखा उद्घाटनाचा आणि हुतात्मा उमाजी नाईक विद्यालयात कै. अर्चना राहुल गायकवाड यांच्या स्मरणार्थ गरीब महिलांना साडी वाटप, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी धाण्याचा टेम्पो रवाना करणे तसेच शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.
याप्रसंगी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, श्यामराव भिंताडे, योगेश फरतडे, गौरी कुंजीर, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे-पाटील, भटक्या विमुक्त जाती सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड, ऋतुजा धुमाळ, राहुल गिरमे, रामदास जगताप, संदेश पवार, किरण गदादे, कोमल निगडे, बबूसाहेब माहुरकर,
भटके-विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, विजय जाधव, पुष्कराज जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सोनाली गायकवाड, बाप्पू मोकाशी, उत्तम गायकवाड, केशव दिघे, अरुण चौधरी, संजय पवार, बाळू जैनक, गणेश सोळंकी, श्रद्धा सोळंकी यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर, प्रास्ताविक सुधाकर जगदाळे यांनी तर बाळासाहेब भिंताडे यांनी आभार मानले.
“त्यांना’ प्रवाहात आणणे गरजेचे
भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणणे गरजेचे आहे. त्यांच्या शाळांना भेट देऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या समाजासाठी कै. यशवंतराव चव्हाण यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता.
यावेळी अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय ही चांगली शैक्षणिक संस्था श्याम काकांनी काढली आहे. त्यामुळे या विद्यालयमध्ये आजही चांगले विद्यार्थी घडत असल्याचे सुळे यांनी यावेळी नमूद केले.