मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले होते. 2 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील या लढतीत तांबे यांनी बाजी मारली आणि पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवनानंतर मला झाशीच्या राणीसारखं लढायचं होत अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली होती. या प्रतिक्रियेवर भाजपचे अतुल भातखळकर यांनी टीका केली. या टीकेला काँग्रेसचे सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
“मी झाशीच्या राणीच्या पायाची धूळही नाही. पण झाशीची राणी लढली तसं मला लढायचं होतं. एक मोठी धनसंपत्ती, अगदी अब्जोमध्ये आणि मी तर झोपडी होते. तो तर फार मोठा बंगला होता. ४० हजार मतं मला मिळाली” अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली होती. त्यावर भातखळकर यांनी एक ट्विट केले,”स्वतःच स्वतःची तुलना राणी लक्ष्मी बाईंशी करणे, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का लाचारांनो?” असा खोचक सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यान्चायत झालेल्या लढतीनंतर शुभांगी पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रिएवरून सोशल मीडियावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. तसेच विजयी सत्यजित तांबे अपक्ष निवडून आल्यानंतर नवीन कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.