मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले होते. 2 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यावेळी भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली. तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही सत्यजित तांबे यांनी मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला.तांबे यांच्या विजयानंतर शुभांगी पाटील यांनी हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झाला असल्याचा आरोप केला आहे.
ही निवडणूक लढत असले तरी जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती असं देखील शुभांगी पाटील यामुळे म्हणाल्या. तसेच सत्यजित तांबे यांना राजकीय वारस आहे मात्र मला कोणताही राजकीय वारस नसताना मी ही निवडणूक लढवली असल्याचे देखील शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले. माझा पराभव झाला असला तरी आता माझी खरी लढाई सुरु झाली असल्याचही पाटील यावेळी म्हणाल्या.
जनतेने तांबे यांना घाम फोडला असं म्हणत पराभव झाला असला तरी मला शिक्षकांसाठी मोठे आंदोलन करायचे आहे. असं शुभांगी पाटील यांनी यावेळी सांगितले. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर निवडणूक चुरशीची होणार असं अनेकांचं म्हणणं होत मात्र तांबे यांनी सर्व ताकद पणाला लावत विजय खेचून आणला.
यावेळी सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.विजयानंतर तांबे म्हणाले, “जनतेचे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली. डॉ सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल”