मुंबई : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वृक्ष लागवड करून सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण करणारे अभिनेता सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर वृक्षलागवडीवरून टीका केली आहे. सरकार वृक्ष लागवड ही केवळ नाटक असून हे दिखाव्यासाठी करण्यात येत असल्याचे म्हणत सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला. 5 कोटी वृक्षांच्या लागवडीचा विषय पुर्णपणे थोतांड असल्याचेही शिंदे यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरकारवर टीकास्त्र उगारले.
राज्य सरकारकडून राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यात 33 कोटी वृक्ष लावण्याचा सरकारचा मानस आहे परंतू, ही योजनाचा दिखाव्याची असल्याचे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याकडे 250 प्रकारच्या वृक्षांच्या जातीच्या प्रजाती आहेत परंतू, आपण पारंपारिक पद्धतीने लावण्यात येणारे झाडेच दरवर्षी लावतो. तसेच दरवर्षी त्याच खड्डयात नव्याने झाडे लावली जातात. म्हणून राज्य सरकारची ही योजना दिखाव्यापुरतीच असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.