आळंदी – नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।। या संत वचनाप्रमाणे माऊलींच्या 725व्या सोहळ्यानिमित्त गावोगावी जाऊन ज्ञानेश्वरी पारायण उपक्रमाची सांगता झाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (725)व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचविण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी व महंत हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे वर्षभर गावोगावी जाऊन श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या आणि बाराव्या अध्यायाचे सामूहिक पारायण, कीर्तन सेवा करण्यात आली.
मंगळवारी (दि. 7) ग्रंथ दिंडी, नगर प्रदक्षिणा, हभप चैतन्य महाराज देगलुरकर यांचे काल्याचे कीर्तन, महाप्रसाद होऊन उपक्रमाची सांगता झाली. यावेळी ज्या 108 ठिकाणी उपक्रम राबवला अशा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची सेवा आणि प्रसार करणाऱ्यांना माऊलींच्या चांदीच्या चल पादुका देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभर ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, विष्णूमहाराज चक्रांकीत, डॉ. नारायण महाराज जाधव, योगिराज महाराज गोसावी, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक समिती सदस्य अजित वडगावकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी जिल्हापरिषद सदस्या सुरेखा मोहीते, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले, श्रीधर सरनाईक, डॉ. दीपक पाटील, नरहरी महाराज चौधरी, चरित्र समितीचे प्रसिद्धीप्रमुख एम. डी. पाखरे, सुनिल बटवाल, ज्ञानेश्वर फड, प्रभुराज महाराज पाटील, चरित्र समितीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीच्या 1 ते 18 अध्यायांवर आधारित प्रथम ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमात 860 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी, 16 जणांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. दत्तात्रय भिमराव बोरकर (आळंदी), बालाजी नरसिंग शेंडगे (लातूर), दिपक नवनाथ शिंदे (आळंदी), जगदीश यमाजी हांडे (औरंगाबाद), ओंकार विलास दुडे (आळंदी), पुंडलिक वसंत जाधव (आळंदी) सोमनाथ हनुमान मोरे (बीड), ज्ञानदेव आनंदराव ढेकळे (औरंगाबाद), दिपक आधार पाटील (मुक्ताईनगर), सखाराम राधाकिसन पितळे (आळंदी), राजलक्ष्मी राजेंद्र झामरे (आळंदी), डाॅ. शेखर शामराव देशमुख (परभणी), आकाश उद्धवराव सोनवणे (आळंदी), अजय शंकरराव खैरनार (औरंगाबाद), राजाराम आसाराम काटे (आळंदी), आसाराम विष्णु आव्हाड (आळंदी) या गुणवंतांना ज्ञानेश्वरी, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ऑनलाईन परीक्षा उपक्रमासाठी राजेश किऱ्हाड, नरसिंह पांचाळ यांनी परिश्रम घेतले. ही परीक्षा 4 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती.