नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून निघाला आहे. या प्रकरणावर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत असून आरोपला कडक शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, त्याचेही 500 तुकडे करा असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे.
या प्रकाणावर बोलताना त्यांनी, “हिंदूंनी एकजूट व्हा. कान उघडून ऐका. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या, आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, त्याचेही 500 तुकडे करा, त्यानंतर मार्ग सापडेल. दुसऱ्या दिवशी निधी गुप्ता मृतावस्थेत सापडणार नाही”, असे साध्वी प्राची म्हणाल्या. हिंदू मुलींना मुस्लिम मुलांशी मैत्री करण्यास आणि प्रेम करण्यास साध्वी प्राची यांनी सक्त विरोध केला. यासोबतच त्यांनी प्रत्येक पालकांना आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आल्या, जेणेकरून कोणताही जिहादी तिला आपल्या तावडीत अडकवू नयेत. असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना साध्वी प्राची म्हणाल्या, “भारतात अत्यंत सुनियोजित षडयंत्र रचले जात आहे. इथे हिंदू मुलींना कसे अडकवले जाते, त्यांच्यासोबत लव्ह जिहाद केला जातो. ही एक श्रद्धा नाही, कधी निधी गुप्ता येते तर कधी श्रद्धा येते. अशा घटना फक्त हिंदू मुलींसोबतच का होतात? तर हिंदू मुलंही मुस्लिम मुलींशी लग्न करतात. आजपर्यंत भारतात त्याच्यासोबत अशी एकही घटना समोर आलेली नाही.”
आफताबबाबत साध्वी प्राची यांनी, भारतीयांनी कान उघडून ऐकावे. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या, जिथे आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले आहेत, तिथे 500 तुकडे करा, मार्ग सापडेल, साध्वी प्राची यांनी म्हटले आहे.