कर्जत – आपण ज्यांना आदरार्थी मानतो अशा ज्येष्ठांनी दिलेला सल्ला नेहमीच अंतिम असेल. मात्र लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवूनच आजवर काम करत आहे. येथून पुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच दुप्पट वेगाने कार्यरत राहिल अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली. मंत्रीमंडळ विस्तारानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
पवार म्हणाले, नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण दिलेली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी पार पाडतील. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार तसेच पक्षातील ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकास माझा समावेश मंत्रीमंडळात असावा अस वाटतं होतं. त्या सर्वांचे आ. रोहित पवार यांनी आभार मानले.