मुंबई – राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.
When elections come closer then you remember Marathi boards, Marathi pride. What will you (State govt) get from Marathi signboards? Youth struggle to find a job. Have they launched any scheme to provide employment?: AIMIM Maharashtra unit president & MP Imtiaz Jaleel (13.01) https://t.co/xUh5LptB1f pic.twitter.com/oy4VctpqF6
— ANI (@ANI) January 13, 2022
हा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान व्यापार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया देताना ”कुंभकर्णची झोप मोडली, त्याबद्दल अभिनंदन’ असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले इम्तियाज जलील
”निवडणुका जवळ आल्या की आठवतात मराठी पाट्या, मराठीचा अभिमान. मराठी फलकांमधून तुम्हाला (राज्य सरकार) काय मिळणार? नोकरी शोधण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे. त्यांनी रोजगार देण्यासाठी कोणतीही योजना सुरू केली आहे का ?”
ते पुढे म्हणाले,’ गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. मोठा तोटा होत आहे. भविष्यात काय होईळ माहिती नाही, उद्या दुकाने आम्ही उघडू शकणार की नाही, लॉकडाऊन होणार का? अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर सरकार सांगत असेल की दुकानांच्या पाट्या बदलायच्या आहेत. सरकारला मराठीवर इतकं प्रेम आहे तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या तुम्ही बदला.’