नवी दिल्ली – पाकिस्तानात अल्पकालीन अधिकृत व्हीसा घेऊन गेलेले सुमारे 100 युवक गेल्या तीन वर्षात एक तर परत आले नाहीत अथवा त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे स्लीपरसेल म्हणून कार्यरत असल्याची शंका व्यकत होत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांपुढील आव्हान वाढले आहे.
या बाबतच्या धोक्याची जाणीव गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झाली होती. हंडवारा येथे पाच दहशतवाद्यांच्या एका गटाला चकमकीत कंठस्नान घातले होते. त्यातील एक जण हा स्थानिक युवक होता. तो 2018 मध्ये पाकिस्तानला गेला होता. तेथून परत आला नव्हता, असे सुरक्षा यंत्रणांच्या अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी एक ते सहा एप्रिलच्या दरम्यान शोपिअन, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील अनेक युवक दहशतवाद्यांसह घुसखोरी करताना आढळले होते. ते सर्व जण वैध व्हीसावर पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर ते परतले नव्हते. सुरक्षा यंत्रणा इमिग्रेशन अधिकाऱ्यांसह गेल्या तीन वर्षात वाघा सीमा आणि नवी दिल्ली विमानतळावरून सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी पाकिस्तानात गेलेल्या तरुणांचा तपशील गोळा करत आहेत.
ही संख्या धक्कादायक आहे आणि काही प्रकरणात पाकिस्तानात गेल्यावर ते परत आलेच नाहीत किंवा परत आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. ते स्लीपर म्हणून कार्यरत असावेत. ते त्यांचा दहशतवादी संघटनेचा हॅंडलर किंवा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या आदेशाची घुसखोरीसाठी वाट पहात असावेत, अशी अटकळ बांधली जात आहे.
दोन वर्षापूर्वीही पाकिस्तानात गेलेल्या युवकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्या वर्तनाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्याला काहीसा विरोध झाला. मात्र, कोणत्याही आजारातून बरे होण्यापेक्षा सावधानता बाळगलेली बरी, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चौकशीसाठी बोलावलेल्या युवकांना पाकिस्तानात जाण्याचे अधिकृत कारण विचारण्यात आले. या सर्वांची पार्श्वभूमी अत्यंत काटेकोरपणे तपासण्यात आली.
भरती करणारे दुप्पट
नव्या दहशतवाद्यांना सहा अठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या काळात उपलब्ध होणाऱ्या स्फोटकांच्या सहाय्याने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. अनेक दहशतवादी संघटनांत गोपनीय पध्दतीने भरती सुरू आहे. काही महत्वाच्या व्यक्तींनी केलेल्या ब्रेन वॉशिंगमुळे भरती करणाऱ्यांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
दहशतवादाचा नवा चेहरा
Shocking! The 100 officially departed Kashmiri youths have not returned from Pakistanबेपत्ता झालेले युवक सामान्य मध्यम वर्गातील आहेत. आणि ते कास्मिरातील दहशतवादाचा नवा चेहरा असण्याची शक्यता आहे. नियंत्रण रेषेवर वाढत्या गस्तीमुळे त्यांना अद्याप शस्त्र आणि दारूगोळ्याचा पुरवठा झाला नसावा असे मनण्यात येत आहे.