पुणे – देशभरात करोना संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे बहुसंख्य नोकरदारांना‘वर्क फ्रॉम होम’कराव लागतं आहे. परिणामी अनेक जोडपे २४ तास घरातच अडकून पडले. मात्र या कालवधीत जोडप्यांचे खटके उडण्यास सुरुवात झाली. परिणामी कौटुबींक हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढला. याचा फटका पुरुषांना बसल्याचा धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांच्या‘ट्रस्ट सेल’ने केला.
पुणे पोलिसांच्या ट्रस्ट सेल प्रमुख सुजाता शानमे यांनी सांगितलं की, लॉकडाऊनपूर्वी एका वर्षात पुणे पोलिसांच्या ट्रस्ट सेलकडे कौटुंबिक वादाच्या 1283 तक्रारी आल्या होत्या. यामध्ये 791 तक्रारी बायकाच्या होत्या, तर केवळ 252 तक्रारी पुरुषांच्या होत्या. मात्र लॉकडाऊनच्या काळात तक्रारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
लॉकडाऊनच्या मागील 15 महिन्यांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींची संख्या वाढून 3 हजार 75 वर पोहोचली आहे. यामध्ये महिलांवर अत्याचार होणाऱ्या तक्रारीची संख्या 1540 आहे, तर पुरुषांवरील अत्याचारांची संख्या 1535 एवढी आहे. पुरुषांवरील अत्याचाराच्या तक्रारीपेक्षा महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींची संख्या 5 ने कमी असली तरी लॉकडाऊनच्या आधीच्या वर्षापेक्षा पुरुषांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असंही शानमे यांनी सांगितलं.
शानमे यांनी पुढे म्हटलं की, मागील दीड वर्षात दाखल झाल्या ३ हजारहून अधिक तक्रारींमध्ये मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाची प्रकरणे आहेत. अनेकदा भांडण झाल्यानंतर बायका मुलांना घेऊन माहेरी गेल्या आहेत, त्या अद्याप परत आल्या नाहीत. त्यामुळे पुरुषांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत, असल्याचं शानमे यांनी सांगितलं.
दरम्यान 24 तास बंद खोलीत एकटं राहिल्यामुळे नवरा बायकोंमधील मानसिक तणाव वाढत गेला आहे. छोट्या छोट्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत आहेत. अशा लोकांना कॉलवरून किंवा ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही सुजाता शानमे यांनी सांगितलं.