लाहोर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तसेच तणाव नवीन नाही. दोन्ही देशांत व्यापार सुरू राहतो मग विनाकारण क्रिकेटलाच विरोध का केला जात आहे, अशी विचारणा पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला आहे.
क्रिकेट वगळता अन्य क्रीडा प्रकारात या दोन्ही देशांमध्ये सामने होतात. मग विनाकारण क्रिकेटलाच सातत्याने विरोध का केला जातो, हे समजत नाही, असे मत अख्तरने व्यक्त केले आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव खूपच वाढला असल्यामुळे या दोन संघात मोजके क्रिकेट सामने झाले आहेत. या पुढे देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने खेळले जातील की नाही याबाबत ब-याच चर्चा रंगताना दिसतात.