नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने भारतात प्रचंड कहर सुरू ठेवला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत 166 लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 5734 वर पोहोचली आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा कोरोना व्हायरस पसरला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान इतर देशांकडून मदतीची विनंती करत आहे. त्याची प्रकृती इतकी वाईट आहे की डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचारासाठी एक किटही नाही.
कोरोना व्हायरस रूग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरचा मृत्यूही झाला आहे. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्ताने कोरोना व्हायरस साथीचा मिळून सामना करण्यासाठी विनंती केली आहे. शोएब अख्त म्हणाला, जर भारताने आम्हाला दहा हजार व्हेंटिलेटर दिले तर पाकिस्तान आयुष्यभर ते लक्षात ठेवेल.