पुणे – ‘शिंदे गटाची जी ओरिजनल शिवसेना आहे ती आमच्याबरोबर आहे बाकी उरलेले शिवसेनेचे आम्हाला माहीत नाही मात्र मीडियाने उगाच पतंगबाजी करू नये.’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच आता या वादावर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुढे म्हणाले,’दसरा मेळावा घेण्यासाठी सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही, नियमात असेल त्यांना मैदान दिले जाईल. ते पुढे म्हणाले उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्यामुळे त्यांना निराशा आली आहे. त्या निराशेतून ते बोलत आहेत, त्यामुळे निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.