मुंबई: ‘शिवथाळी’साठी आधारसक्ती ! फोटो जुळला तरच मिळणार गरिबांना अन्न मिळणार? शिवथाळीच्या नावाने ‘ठाकरे सरकार’ गोर गरिबांची निव्वळ चेष्ठा करीत असल्याचे भाजपने म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत ‘१० रुपयात पोटभर जेवण’ हा मुद्दा चांगलाच गाजला होता. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात १० रुपयात जेवण देण्याचं आश्वासन दिलं होतं.
ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेनं आपलं वचन पाळलं आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना १० रुपयात जेवण ही योजना महाराष्ट्रात राबण्यात येणार आहे.
दरम्यान, गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून ही अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.