मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच राजनाथ सिंह यांनी वि.दा. सावरकर यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता. यावरून सावरकर आणि महात्मा गांधी यांची नाव घेण्याची तरी आपली लायकी आहे का ? असा तिखट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची चिन्ह आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही हिंदुत्वावरून सवाल केले. ते म्हणाले की, मोहन भागवत यांचे विचार काय आहे तर आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का ? एकीकडे हिंदूत्व म्हणजे, आम्ही कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, असा विचार तुम्ही देताय पण दिवसाढवळ्या जे दिसतंय, ते मोहन भागवत तुम्हाला मान्य आहे का ?, असे प्रश्नही उद्धव यांनी उपस्थित केले.