मुंबई – आज महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर बोलण्यासारख काही नाही अस पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल आहे. भाजप शिवसेनेने या निवडणुकीत बहुमत प्राप्त केल आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन कराव. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत, अस ही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे.
Sharad Pawar,NCP Chief: I don’t have anything to say yet. BJP and Shiv Sena have got the mandate of people, so they should form government as soon as possible. Our mandate is to play the role of Opposition. #Maharashtra pic.twitter.com/7Yc64DZQ5H
— ANI (@ANI) November 6, 2019
पवार पुढे म्हणाले की आज संजय राऊत यांनी माझी भेट घेतली. त्यांची आणि माझी भेट नेहमीच सकारात्मक होते तशी ती आजही झाली. वेगळं समीकरण असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही असंही शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रपती राजवट लागू होण्यास रोखायची असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच सरकार स्थापन कराव. याशिवया दुसरा कोणताच पर्याय नाही अस त्यांनी म्हटल आहे. शिवसेना आणि भाजप गेली 25 वर्षांपासून सोबत आहेत. ते कालही सोबत होते आजही आहेत आणि पुढेही ते एकत्र राहतील अस यावेळी पवार म्हणाले.
Sharad Pawar,NCP Chief: Sanjay Raut(Shiv Sena leader) met me today and discussed about the upcoming Rajya Sabha session. There are some issues we discussed on which we can have a similar stand. pic.twitter.com/uFDcgpwIwb
— ANI (@ANI) November 6, 2019
महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाबाबत पवार म्हणाले की केंद्रसरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. मी मागील काही दिवसांमध्ये पावसााचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये पाहणी केली आहे त्यामुळे सरकाराने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी. विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास चालढकल करत आहेत. त्यामुऴे या प्रकरणी वित्त मंत्रालयाने लक्ष घालाव, अशी मागणीही पवारांनी यावेळी केली आहे.
Sharad Pawar: Centre should help farmers whose crops have been damaged due to rains.I visited affected areas and feel that farmers must be provided relief.Another issue is of insurance companies not paying farmers for crop damage, Finance ministry should intervene in this matter pic.twitter.com/MdiKeNqTUJ
— ANI (@ANI) November 6, 2019