सांगली – गुढीपाडव्याच्या दिवशी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री व भाजपचे नेते शिवाजीराव नाईक यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली आहे. नाईक यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नाईक व त्यांच्याकार्यकर्त्यांनी राष्ट्र्वादीमध्ये घरवापसी केली आहे. यावेळी राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटीलही उपस्थीत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी योग्य न्याय दिला नसल्याचा आरोप करत नाईक यांनी भाजपा सोडले आहे. दरम्यान नाईकांच्या घरवासीमुळे सांगलीत राष्ट्रवादी भक्कम होणार आहे तर भाजपला भगदाड पडणार आहे, हे निश्चित.
भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे धोरण हे एकाला जवळ करायचे आणि दुसऱ्याला त्रास देत खोळ्या करत राहायच्या, असा आरोप नाईकांनी केला आहे. याशिवाय 2019 च्या निवडणुकीत शिराळा मतदारसंघात नाईक यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत नाईक यांना 76 हजार 2 इतकी म्हणजे 33 टक्के मते पडली होती. चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच शिराळ्यात आपला हा पराभव झाल्याचा आरोप शिवाजीराव नाईक यांनी केला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांचा वेगळा हेतू आहे, मात्र त्याचा परिणाम आम्हाला इथे सहन करावा लागला. वेगळ्या खेळ्या करून त्यांनी हेतू पुरस्कर भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला. त्यांच्याकडून ज्या पद्धतीची वागणूक हवी होती, ती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत.असेही नाईक म्हणाले आहेत.