मुंबई – राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले यांनी सुद्धा तिखट प्रतिक्रिया दिली आहे,राज्यपालांनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे
‘भगतसिंह कोश्यारी यांची सतत महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्ये येत होती. महाविकास आघाडीने अनेकदा त्यांचा विरोध केला होता. राज्यपालांची भूमिका नेहमी मराठी माणसाच्या विरोधात होती. महाराष्ट्राचा अपमान करण्यासाठीच त्यांना भाजपाने किंवा केंद्रातल्या मोदी सरकारने पाठवलंय की काय अशी स्थिती होती. आम्ही त्यांच्याविरोधात अनेकदा मोर्चा काढला, अधिवेशनात आवाज उठवला होता.’ ते पुढे म्हणाले,’नेहमीच महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला. जनमत हे कोश्यारींच्या विरोधात असूनही त्यांना जास्त दिवस पदावर कायम ठेवलं. परंतु सरकारने आता त्यात दुरुस्ती केली आहे. परंतु मी काही सरकारचे आभार मानणार नाही. उलट महाराष्ट्रातली घाण गेली असंच मी म्हणेन.”