कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय तर राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटली असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे.
विमा कंपन्याबाबत उद्धव ठाकरे यांना अचानक जाग आली असून विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याआधी शिवसेनेने सरकारने विमा कंपनीशी काय करार केला आहे हे तपासावा तो करार कोणत्या पद्धतीने का झाला याचा जाब मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावा आणि मग मोर्चा काढण्याची भाषा करावी, असा सल्ला देखील शेट्टी यांनी दिलाय. एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो ही नाटक करायची. ही शिवसेनेची नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहेत. आता शेतकरी फसणार नाही, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.