लोकसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहेत. पुन्हा भाजप सत्ता स्थापनेसाठी तयार असून भाजपने ३०० पेक्षा जास्त ऐतिहासिक लीड घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात हातकणंगले मतदार संघातून शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पराभूत झाले आहेत. धैर्यशील माने यांना ५,४३,३६६ मते पडली आहेत. तर राजू शेट्टी यांना ४,४४,३४७ मते पडली. राजू शेट्टींचा अवघ्या ९९,०१९ मतांनी पराभव झाला आहे.
हातकणंगले मतदार संघातून शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी पराभूत#हातकणंगले #लोकसभानिवडणूक२०१९ #महाराष्ट्र #LokSabhaElections2019 pic.twitter.com/BovmLLQiuH
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 23, 2019