नागपूर : आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे. आरेतील आदिवाशी पाडे स्थलांतरित करून खासगी ठेकेदारांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
सत्तेत आल्यावर आरेला जंगल घोषित करू असं आश्वासन शिवसेनेने दिल होत. मात्र आदिवासींना स्थलांतरी करून त्यांच्या जमिनी हडप करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल तर तो आम्ही हाणून पाडू असे शेलार म्हणाले.
याबाबत माध्यम प्रतिनिधिशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, आदिवासी पाड्यात चांगले रस्ते पाणी, वीज, आरोग्याच्या सोई सुविधा, पक्की घरे मिळालीच पाहिजेत. आरेमध्ये जे आदिवासी पाडे आहेत येथील लोकांना सोई सुविधा देण्यास आमचा विरोध नाही. आदिवासीच्या कला संस्कृतीचेही जतन करायला हवे अशी आमची भूमिका आहे.
आज विधानसभेत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी आदिवासी पांड्याना पुनर्विकसित करण्याची भूमिका मांडली होती. त्यावर आमदार आशिष शेलार यांनीं आदिवाशी पांड्याना हडप करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप केला .