मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून काँग्रेससोबतची जवळीक वाढवण्यावर भर देण्यात आला. अनेकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींवर स्तुती सुमने देखील उधळली. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाने लोकशाही धोक्यात असल्याचे म्हंटले होते. यावरूनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणीबाणीची आठवण करून देत काँग्रेसच्या जवळ चाललेल्या ठाकरे गटावर टीका केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे., आपल्या ट्विटमध्ये देशपांडे म्हणतात,”ज्या काँग्रेस नी देशामध्ये आणीबाणी लावली त्याला शिवसेनेनी पाठिंबा दिला आताचा राष्ट्रवादी त्याच काँग्रेसचा भाग होता तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का ?” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
ज्या काँग्रेस नी देशामध्ये आणी बाणी लावली त्याला शिवसेनेनी पाठिंबा दिला आताचा राष्ट्रवादी त्याच काँग्रेस चा भाग होता तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का ????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 28, 2023
सावकारांवरून राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. ज्यावरून राज्यसह देशातील भाजप नेते राहुल गांधींना लक्ष करत आहेत. अशात मालेगाव येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी देखील ‘सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचे म्हंटले होत’. यावरून देखील संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला होता. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नक्की काय करणार ? असा प्रश्न देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत विचारला होता.