Shivsena UBT MP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात अंतर्गत नाराजी (Shivsena UBT MP) आणि धुसफूस मोठ्या प्रमाणात वाढली असून, ती आता मातोश्रीपर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत खासदारांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. विशेष धक्कादायक बाब म्हणजे, एका खासदाराने (Shivsena UBT MP) उद्धव ठाकरे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत त्यांच्याकडून २० कोटी रुपयांची मदत घेतल्याची कबुली दिली. या घटनेने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंची मदत आणि पक्षाची उपेक्षा मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत एका खासदाराने थेट आरोप केला की, “आम्हाला पक्षाकडून साधी मदतही मिळत नाही. संकटाच्या काळात पक्षाने आमच्याकडे पाठ फिरवली.” त्यांनी पुढे धाडसी वक्तव्य करत सांगितले की, “मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असूनही एकनाथ शिंदे यांनी मला २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. Uddhav Thackeray कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आणि विकासकामांसाठी निधीची गरज होती, तेव्हा शिंदे साहेबांनी सढळ हाताने मदत केली.”या वक्तव्याने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खासदाराने स्पष्ट केले की, पक्षाकडून कोणतीही आर्थिक किंवा अन्य मदत न मिळाल्याने आता पक्ष सांभाळणे कठीण होत चालले आहे. २०२९ ची निवडणूक लढवणार नाही दुसरीकडे, दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतही नाराजीचा सूर उमटला. एका खासदाराने थेट घोषणा केली की, “मी २०२९ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही.” त्यांनी सांगितले, “उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमचे म्हणणे पोहोचत नाही. नेत्यांशी संपर्कच नाही, तर पक्ष पुढे कसा जाणार?” निवडणुकीत कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने पक्षात राहणे कठीण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर संजय राऊत यांनी चिंता व्यक्त करत अनिल देसाई यांना उद्देशून म्हटले, “हे खासदार काय म्हणत आहेत ते पहा आणि उद्धव साहेबांना याची कल्पना द्या.” माजी आमदारांच्या गळतीची भीती पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या संवादाच्या अभावामुळे केवळ खासदारच नव्हे तर माजी आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आणखी एका खासदाराने दिली. त्यांनी सांगितले की, “एक माजी आमदार लवकरच दुसऱ्या गटात सामील होणार आहेत.” कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी पैसे लागतात, मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. “अशा स्थितीत मी त्यांना कोणत्या आधारावर थांबवू?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट माजी आमदारांशी बोलण्याची मागणी केली. ‘स्क्रीप्ट’नुसार झालेली चर्चा मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत काय बोलायचे याची ‘स्क्रीप्ट’ आधीच दिल्लीतील बैठकीत ठरवण्यात आली होती. खासदारांनी एकमेकांशी चर्चा करून आपल्या मागण्या आणि नाराजी मांडण्याचे निश्चित केले होते. कार्यकर्त्यांना मदत मिळाली नाही तर पक्ष टिकणार कसा, हा कळीचा मुद्दा या बैठकीत वारंवार चर्चिला गेला. पक्षापुढील आव्हान जर ही अंतर्गत नाराजी लवकर दूर झाली नाही, तर उद्धव ठाकरे गटाला मोठ्या गळतीचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. पक्षातील खासदार आणि नेत्यांमधील असंतोष आता उघडपणे समोर येत असल्याने, उबाठा पक्षासाठी आगामी काळ अत्यंत कठीण ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.