मुंबई – शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होत. या स्पर्धेत अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील, असं सकपाळ यांनी सांगितलं. त्यांचा या भूमिकेनंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. या मुद्यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सेनेला टोला लगावला आहे.
शिवसेनेवर टीका केली तर उत्तर द्यायला शिवसेना नेते नसले तरी काँग्रेसवाले तात्काळ हजर असतात.
भ्रष्टाचाराबाबत दोन्ही पक्ष एकमेकाला वरताण आहेत, फरक फक्त भगव्यामुळे होता. आता शिवसेनेने भगवा गुंडाळल्यानंतर शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे??? @OfficeofUT pic.twitter.com/dPgf84ra11— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 1, 2020
काय म्हणाले अतुल भातखळकर
‘शिवसेनेवर टीका केली तर उत्तर द्यायला शिवसेना नेते नसले तरी काँग्रेसवाले तात्काळ हजर असतात. भ्रष्टाचाराबाबत दोन्ही पक्ष एकमेकाला वरताण आहेत, फरक फक्त भगव्यामुळे होता. आता शिवसेनेने भगवा गुंडाळल्यानंतर शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे??? ते पुढे म्हणाले, त्यांनी केवळ हिरवा झेंडा खांद्यावर घेणंच तेवढे बाकी राहिले आहे.’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. ‘
तत्पूर्वी, हो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे. नाहीतर “हो मी नामर्द आहे” असं तरी सांगा, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.