मुंबई – पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचे पथक रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, ”आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू, असं इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी भाजप सरकार करत आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. ही दबाव व त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी कारवाई आहे. अजून किती लोकांना त्यांना जेलमध्ये टाकायचं हे त्यांनी ठरवावं. परंतु भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीनं हलवू शकणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल यात दुमत नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
“आपले पाप लपविण्यासाठी अशी कारवाई करणे हे नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलावून वातावरण बदललं गेलं. मूळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट आहे. राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला. जो घाव केला. त्याला जनता कधी विसरणार नाही. राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही पटोले यांनी दिला.
“ईडीवाले घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत”
भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठवण्याचं काम आता ते करणार आहेत. एका पार्टीला संपवून आम्ही कसे जिवंत राहू अश्या पद्धतीच घाणेरडे राजकारण 75 वर्षात कोणी केले नाही. हे खालच्या पातळीच व लोकशाहीला घातक राजकरण केंद्रातलं भाजप सरकार करतंय हे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
शिंदे गटाकडून राऊतांवरील कारवाईचे समर्थन होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र…