मुंबई – पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचे पथक रविवारी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींदरम्यान आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय”, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना मारला आहे.
नितेश राणे म्हणाले, “रोज सकाळी आपल्या सर्वांची सकाळ खराब करणाऱ्यांचीच सकाळ आता खराब झाल्याने, निश्चितपणे समाधान वाटत आहे. तसेच पत्रचाळमध्ये जे गरीब रहिवासी होते, जे मराठी कुटंब होते. त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे,” असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर रामदास कदमांची प्रतिक्रिया; म्हणाले…
राणे म्हणाले, “संजय राऊत नावाचा व्यक्ती स्वतःला फार मोठं समजायची आणि झुकेगा नही वैगेरे डायलॉक म्हणायची, आता त्यांना विचारा आतमध्ये… शेवटी भ्रष्टाचार करायचा, महिलांवर अत्याचार करायचा, त्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना वाटत असेल, की त्यांना कधीच काही होणार नाही. तर आता त्यांना, ईडीची चौकशी काय असते आणि दुसऱ्यांना त्रास देणे काय असते. हे निश्चित कळत असेल.”
४० आमदार १२ खासदार आज सर्वजण आनंदी; राऊतांवरील कारवाईवर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया