मुंबई : राज्यात एका रात्रीत घडलेल्या सत्तास्थापनेच्या खेळीने राजकारणच पुर्ण बदलून गेले आहे. त्यात आता भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबत मिळून राज्यात सत्तास्थापन केली आहे. त्यामुळे आता राज्यात नवे सत्ता समिकरण निर्माण झाले आहे. त्यातच आता भाजपच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. भाजपेचे नेते गिरीश महाजन यांनी वेळ पडली तर शिवसेनेचे आमदारही आमच्यासोबत येऊ शकतात असे धक्कादायक विधान केले आहे.
Girish Mahajan,BJP on Sanjay Raut: Verbal diarrhoea will be the right phrase to use for him. Even many Shiv Sena MLAs are frustrated with him and they may also think of going with us. pic.twitter.com/UKMA2yimCe
— ANI (@ANI) November 23, 2019
आम्ही 170 आमदारांच्या पाठिंब्यासह बहुमत सिद्ध करु. अजित पवारांनी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होतो असे भाजपाचे नेते गिरीश महाजन म्हणाले.
शिवसेनेकडून सातत्याने पक्षाची भूमिका मांडणारे संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. अनेक शिवसेना आमदार संजय राऊत यांना कंटाळले आहेत. ते सुद्धा आमच्यासोबत येऊ शकतात असे गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने नाटयमय घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.