मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे लागून आता 15 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी झाला आहे परंतू, राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापण होण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे राज्याज फोडाफोडीचे राजकारण होणार असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, शिवसेनेने खबरदारीचा उपया म्हणून आपल्या सर्वच आमदारांना रंगशारदामध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता सेनेच्या सर्वच नवनिर्वाचित आमदारांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे.
शिवसेनेचे सचिव मलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडे आमदारांना पोलिस संरक्षण द्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. ही मागणी मान्य झाली असून शिवसेनेच्या आमदारांना पोलिस संरक्षण मिळाले आहे. आपले आमदार फुटू नये, तसेच ते इतर पक्षाच्या संपर्कात येऊ नये यासाठी शिवसेनेने त्यांच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले होते. मात्र आता त्याठिकाणावरुन त्यांना हलवण्यात आले असून मालाडच्या मढ येथील रिट्रीट हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व आमदारांची 15 नोव्हेंबरपर्यंत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिसांचे संरक्षण मिळावी अशी मागणी मिलिंद नार्वेकरांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य झालेली असून शिवसेनेच्या सर्व आमदारांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेनेचे 56 आमदार आणि शिवसेनाला पाठिंबा देणारे 7 आमदार असे एकूण 64 आमदारांचा शिवसेनाला पाठिंबा असून त्यांची हॉटेलवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.