कोल्हापूर : मनसेच्या उद्याच्या मोर्चावर शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची कोल्हापुरात प्रतिक्रिया दिली आहे. बेगडी हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सुभाष देसाई म्हणाले, शिवसेना कदापिही हिंदुत्वपासून दूर जाणार नाही. काही मतलबी लोक ही टीका करत आहेत हिंदुत्वाचे पाठीराखे आपल्याकडे यावेत, असा काहींचा प्रयत्न आहे.
परंतु हिंदुत्वावर जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेना इतक्या धाडसीपणाने हिंदुत्वाची पाठराखण कुणीच केलेली नाही. अशा बेगडी हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कटिबद्ध आहे, असे देसाई यांनी सांगितले.