मुंबई – शिवसेनेने ठरवले तर बहुमत सिद्ध करु शकते. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: If Shiv Sena decides, it’ll get the required numbers to form stable government in the state. People have given mandate to form government on basis of 50-50 formula that was reached in front of people of Maharashtra.They want Chief Minister from Shiv Sena. pic.twitter.com/mFwLu7LbhV
— ANI (@ANI) November 1, 2019
राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेला गोंधळ आणखी वेगळे वळण घेत आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली. सत्ता स्थापनेचा राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु, शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या चार दिवसांत शरद पावार यांनी शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्याच्या अफवांचे सातत्याने खंडन केले होते. बारामतीत बोलताना ‘जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही ती भूमिका पार पाडणार आहोत’, असे पवारांनी स्पष्ट केले होते.