नगर – एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचा नगर शहरात शिवसेना, भाजप, मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पठाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, वसंत लोढा, अभय आगरकर, सुनील रामदासी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, नगरसेवक रवींद्र बारस्कर, अजय चितळे, पंकज जहागीरदार, सतीश शिंदे, वसंत राठोड, गौतम दिक्षित, सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी, दत्ता हिरणवाळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनानंतर वसंत लोढा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात वारीस पठाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी महेंद्र गंधे, वसंत लोढा, अभय आगरकर, बाबासाहेब वाकळे यांचे भाषणे झाले. यावेळी अनिल गट्टाणी, सुहास मुळे, महावीर कांकरिया, जगन्नाथ निंबाळकर, अन्वर खान, बाळासाहेब गायकवाड, धनंजय जामगावकर, शाकीर सय्यद, संजय ढोणे, उपस्थित होते.
नगर येथील सुभाष चौकामध्ये शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पठाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. वारिस पठाण यांनी दोन दिवसांपूर्वी हिंदू मुस्लिमांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याने या वक्तव्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध होत आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, दत्तात्रय कावरे, संतोष गेनप्पा, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शशिकांत देशमुख, रमेश खेडकर, मदन आढाव, पप्पू भिंगारदिवे, गणेश झिंजे, शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.यावेळी राठोड यांनी वारीस पठाण हा गद्दार असून त्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अशा व्यक्तीला या देशांमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्याला पाकिस्तानमध्ये पाठवून द्या, असे सांगितले. या देशात राहून जर कोणी गद्दारीची भाषा करणार असेल तर त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. अशा गद्दारांना पाकिस्तानातच हाकलून द्या, अशी मागणी त्यांनी केली.
भारत हा सर्व जातीधर्मात गुण्या गोविंदाने नांदणारा देश आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र राहतात. राष्ट्रीय एकतेला धोका पोहचविण्याचे काम पठाण सारखे देशद्रोही करत असतात. अशा देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात सचिन डफळ, नितीन भुतारे, मनोज राऊत, विनोद काकडे, रतन गाडळकर, गणेश शिंदे, गणेश मराठे, अंबादास गोटीपामूल, अभिनव गायकवाड आदी सहभागी झाले होते.